10 December 2009

ने मजसी ने परत मातृभूमीला...



स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी लिहिलेल्या ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला या कवितेला आज शंभर वर्षे पूर्ण झाली आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लिहिलेल्या या कवितेला ज्येष्ठ संगीतकार हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केले आणि ही कविता सर्वसामान्यांच्या ओठावर आली. लता मंगेशकर, आशा भोसले, उषा मंगेशकर, मीना खडीकर आणि स्वत हृदयनाथ या पाच भावंडांनी ही कविता गायली.


ज्येष्ठ संगीतकार आणि गायक सुधीर फडके यांनीही स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटात ही कविता घेतली असून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरच ती चित्रित करण्यात आली आहे. आपल्याला ही कविता/गाणे लता मंगेशकर यांच्या आवाजात परिचित झालेली आहे. हृदयनाथ मंगेशकर यांनी या कवितेला दिलेली चाल आपल्या स्मरणात आहे. मात्र सुधीर फडके यांनीही त्याला वेगळी पण चांगली चाल लावली आहे.


स्वातंत्र्यवीर विनायक  दामोदर सावरकर यांना क्रांतिकारकांचे मुकुटमणी म्हणून ओळखले जाते. अशा या थोर क्रांतिकारक योध्याची स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आपण म्हणजे केंद्र शासनाने उपेक्षाच केली. सावरकर हे कट्टर हिंदुत्वनीष्ठ असल्यामुळेच कॉंग्रेसी सरकारने त्यांचे महत्व वाढू दिले नाही. खरे तर सावरकर हे द्रष्टे राजकारणी आणि नेते होते. त्यांनी काही वर्षांपूर्वी जे जे सांगितले तिकडे आपण वेळीच लक्ष दिले असते आणि गांधीनिती ऐवजी सावरकरनितीने वागलो असतो तर देशापुढे आज जे काही प्रश्न निर्माण झाले आहेत, ते झाले नसते. केंद्रातील कॉंग्रेस शासनाचा सावरकर द्वेष इतका पराकोटीचा होता की आकाशवाणी केंद्रावरुन सावरकर यांनी लिहिलेल्या कविता/गाणी यांच्या ध्वनिमुद्रीका वाजवायलाही बंदी घालण्यात आली होती. मात्र नंतर सावरकर यांची गाणी आकाशवाणीवरुन वाजवायला सुरुवात झाली.


देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी सावरकर यांनी जे काही सोसले त्याच्या नखाचीही सर आजच्या राजकारणी नेत्यांना नाही. सुधीर फडके यांनी निर्माण केलेला स्वातंत्र्यवीर सावरकर हा चित्रपट पाहताना सावरकर आणि आजच्या राजकारणी नेत्यांची तुलना मनात येते. आजचे भ्रष्टाचारी, स्वार्थी, निर्लज्ज, गेंड्याची कातडी असलेले सर्वपक्षीय राजकारणी नेते आणि त्यांच्या भानगडी वाचल्या की या सर्व मंडळींना सावरकर यांनी ज्या अंदमान कोठडीत मरणयातना भोगल्या तेथे आजच्या राजकारणी नेत्यांनाही शिक्षा म्हणून किमान काही दिवस तरी पाठवावे, असे मनात येते.


सावरकर यांनी लिहिलेल्या ने मजसी ने परत मातृभूमीला या गाण्याच्या शताब्दी वर्षाच्या निमित्ताने त्यानीच लिहिलेली ही कविता आज सर्वांच्या माहितीसाठी देत आहे.


ने मजसी ने परत मातृभूमीला

सागरा प्राण तळमळला



भूमातेच्या चरणतला तुज धूता, मी नित्य पाहीला होता

मज वदलासी अन्य देशी चल जाऊ, सृष्टिची विविधता पाहू

तइं जननीहृद् विरहशंकीतहि झाले, परि तुवां वचन तिज दिधले

मार्गज्ञ स्वये मीच पृष्ठि वाहीन, त्वरि तया परत आणीन

विश्र्वसलो या तव वचनी मी, जगद्नुभवयोगे बनुनी मी

तव अधिक शक्त उद्धरणी मी, येईन त्वरे, कथुन सोडीले तिजला

सागरा, प्राण तळमळला ... ॥१॥



शुक पंजरी वा हिरण शिरावा पाशी, ही फसगत झाली तैसी

भूविरह कसा सतत साहू या पुढती, दश दिशा तमोमय होती

गुणसुमने मी वेचियली या भावे, की तिने सुगंधा घ्यावे

जरि उद्धरणी, व्यय न तिच्या हो साचा, हा व्यर्थ भार विद्येचा

ती आम्रवृक्षवत्सलता रे, नवकुसुमयुता त्या सुलता रे

तो बाल गुलाब ही आता रे, फुलबाग मला, हाय, पारखा झाला

सागरा, प्राण तळमळला ...



नभि नक्षत्रे बहुत, एक परी प्यारा मज भरत भूमिचा तारा

प्रसाद इथे भव्य, परी मज भारी आईची झोपडी प्यारी

तिजवीण नको राज्य, मज प्रियसाचा वनवास तिच्या जरि वनीचा

भुलविणे व्यर्थ हे आता रे, बहुजिवलग गमते चित्ता रे

तुज सरित्पते जी सरिता रे, तद्विरहाची शपथ घालितो तुजला

सागरा, प्राण तळमळला ...



या फेनमिषें हससि निर्दया कैसा, का वचन भंगिसी ऐसा ?

त्वत्स्वामित्वा सांप्रत जी मिरवीते, भिऊनि का आंग्लभूमीते

मन्मातेला अबल म्हणुनि फसवीसी, मज विवासनाते देती

तरि आंग्लभूमि भयभीता रे, अबला न माझी ही माता रे

कथिल हे अगस्तिस आता रे, जो आचमनी एक क्षणी तुज प्याला

सागरा, प्राण तळमळला ...


सनातन प्रभात या दैनिकाने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर एक विशेषांक प्रकाशित केला आहे.
त्याची लिंकही खाली देत आहे.

http://www.sanatan.org/marathi/dainik/visheshank/veersavarkar/index.htm


सुधीर फडके यांनी निर्माण केलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटातील या गाण्याचा व्हिडीओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा


http://www.video4viet.com/watchvideo.html?id=8cA4BPFHi7M&title=सागरा%20प्राण%20तळमळला









         

2 comments:

  1. > लता मंगेशकर, आशा भोसले, उषा मंगेशकर, मीना खडीकर आणि स्वत हृदयनाथ या पाच भावंडांनी ही कविता गायली.
    >----

    Asha Bhosle? The only song ('chalaa chalaa navabaalaa) in which all five siblings appear is from 'maajh.n baaL' (1943). Hridaynath was 5 or 6 that time, and was probably held up by Asha because he had difficulty standing properly because of polio. No sister, except Lata to some extent, had developed any sort of style by then, and it is a chorus song about which it is said that all of them sang in it, lending it curio value, and we just have to accept the claim. Not that I have any reason to doubt it. It's a beautiful song, but the credit goes more to the composer Davjekar than the sisters.

    The only instance known to me when all four sisters sang together was when they sang 'bahu asot' during the first Marathi Vishva Sammelan or whatever it is called) around 1989, but Lata and Asha's Baal wasn't a part of it.

    > भरत भूमिचा तारा ... प्रसाद इथे भव्य ... प्रियसाचा
    >
    bharatabhuumeechaa (one word), praasaad ,
    priy saachaa (two words)

    > तरि आंग्लभूमि भयभीता रे
    >
    zari aa.nglabhuumiibhayabheetaa (one word).
    Aanglabhuumee is not bhayabheetaa, it is unmattaa. And if I had a dollar for every instance of this saamaasik word being wrongly split, I would probably be a millionaire. Now I don't even bother to supply the correction, but I am making an exception since yours is one of the better Marathi blogs which I enjoy reading.

    I used to think the word is formed by combining 'aanglabhumee' and 'bhayabheet', but that is not correct. It is formed by combining 'aanglabhumibhay' and 'bheet'. If you must split it, it should read आंग्लभूमिभय भीता रे ...

    Quoting my friend Sushil Sharma's email to me below.

    - dn


    aa~Nglaanaa.m bhuumiH = aa~Ngla-bhuumiH or aa~Ngla-bhuumii [so ShaShThii tatpuruSha in the compound aa~Nglabhuumii]
    then
    aa~NglabhuumyaaH bhaya.m = aa~Nglabhuumii-bhaya.m [so, again, ShaShThii tatpuruSha in the compound aa~Nglabhuumiibhaya.m]
    then
    aa~Nglabhuumiibhayaad.h bhiitaa = aa~Nglabhuumiibhaya-bhiitaa [so, pa~nchamii tatpuruSha in aa~Nglabhuumiibhayabhiitaa]

    (So the word is formed via ShShThii tatpuruSha #1 + ShShThii tatpuruSha #2 + a panchami tatpurushh samaas. A non-saamaasik sandhi would yield 'bhayaadbheetaa', and its saamaasik form is 'bhayabheetaa'.)

    ReplyDelete
  2. फार छान लिहिले आहात

    ReplyDelete